Sunday, March 13, 2011
मंदीची संकट
जागतिक अर्थव्यवस्थेवरचे मंदीचे संकट रंकापासून रावा पर्यंत प्रत्येकास सचिंत करत आहे. अर्थप्राप्तीचे विविध पर्याय समोर असताना अचानक आलेल्या आर्थिक मंदीने अर्थप्राप्तीचा मार्गच अरुंद झाला आहे. अनेकांच्या डोक्यावर टांगती तलवार रात्रीची झोप उडवत आहे. हा भयावह अनुभव केवळ कर्मचारी कपातीमुळे नोकरदारांनाच येत आहे असे नाही तर लहान व्यापारी वर्गापासून मोठ्या व्यापारीवर्गापर्यंत प्रत्येक जण या मंदीच्या जात्याखाली भरडला जात आहे. आपली नोकरी टिकवणे किंवा नवी मिळवण्याची संधी उपलब्ध होणे हे मोठे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे सध्याचा मुख्य प्रश्न उपजीवीका हा झाला आहे. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाताना मनात चिंतेचे ढ्ग निर्माण होतात असा बहुतांश लोकांचा अनुभव आहे, तर व्यापारी वर्गास ग्राहक मिळणे मुश्किल झाले आहे. या परिस्थितीशी सामना करताना गंगाजळी वर भार पडतोच, पण मानसिक थकवाही जाणवतो. यासाठी काय करावे जेणे करुन आपली गुणवत्तेचे,श्रमशक्तीचे योग्य मुल्यांकन होऊन अर्थप्राप्तीचा झरा प्रवाहित होईल हा सगळ्यांना सतावणारा प्रश्न झाला आहे. प्रामाणिक प्रयत्न हे त्याचे प्रधान उत्तर आहे, तरी दैवी उपासना कोणती करावी ? ज्यामुळे मनाचा उत्साह कायम राहील, परिस्थितीशी सामना करण्याचे मनोबल प्राप्त होईल, व्यवहारचातुर्य विकसित होईल व स्पर्धेच्या युगात आपल्या गुणांची योग्य दखल समाजाकडून घेतली जाईल. त्यासाठी अतिशय सोपा उपाय आपल्याकडे सांगितलेला आहे. सकाळी झोपून उठल्यावर कोणाशीही न बोलता गादीवर बसूनच पुढिल मंत्र केवळ १०८ वेळा म्हणायाचा आहे, व दाही दिशांना प्रत्येकी दहा वेळा फुंकर मारायची आहे. मंत्र पुढील प्रमाणे
|| ॐ नमो भगवती पद्म पद्माक्षी ॐ ह्रीं ॐ ॐ पूर्वाय दक्षिणाय उत्तराय पश्चिमाय सर्वंजन वश्य कुरु कुरु स्वाहा ||
हा अनुभव सिद्धमंत्र आहे यामुळे अनेक कुटुंब सुखी झाल्याचा अनुभव आहे. ज्यांचे ग्राहक नक्की नसून रोज नवे ग्राहक शोधावे लागतात अशा फिरत्या व्यापारीवर्गासाठी तर हा मंत्र तारकच ठरतो. जर आपल्या श्रमाची पोच पावती कौतुक, द्रव्य, मानसन्मान अशा कोणत्याही स्वरुपात मिळण्यात अडचणी येत असतील तर या मंत्राचा आपण जरुर जप करा. लाभाचे महाद्वार खुले होईल यात शंका नाही.
विक्रमादित्य पणशीकर,
पेडणे गोवा , ९०४९६००६२२
vnp999@gmail.com
|| ॐ नमो भगवती पद्म पद्माक्षी ॐ ह्रीं ॐ ॐ पूर्वाय दक्षिणाय उत्तराय पश्चिमाय सर्वंजन वश्य कुरु कुरु स्वाहा ||
हा अनुभव सिद्धमंत्र आहे यामुळे अनेक कुटुंब सुखी झाल्याचा अनुभव आहे. ज्यांचे ग्राहक नक्की नसून रोज नवे ग्राहक शोधावे लागतात अशा फिरत्या व्यापारीवर्गासाठी तर हा मंत्र तारकच ठरतो. जर आपल्या श्रमाची पोच पावती कौतुक, द्रव्य, मानसन्मान अशा कोणत्याही स्वरुपात मिळण्यात अडचणी येत असतील तर या मंत्राचा आपण जरुर जप करा. लाभाचे महाद्वार खुले होईल यात शंका नाही.
विक्रमादित्य पणशीकर,
पेडणे गोवा , ९०४९६००६२२
vnp999@gmail.com
Comments:
<< Home
अमोल केळकर has left a new comment on your post "मंदीची संकट":
खुप छान. मनःपुर्वक धन्यवाद !!!
अमोल केळकर
खुप छान. मनःपुर्वक धन्यवाद !!!
अमोल केळकर
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home
Subscribe to Posts [Atom]
Post a Comment