Sunday, March 13, 2011
कर्तव्यपक्ष
गणेशोस्तवाच्या मंगलमय वातावरणा नंतर पितृपक्षाचा प्रारंभ होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या काळाला पितृपक्ष म्हणतात. या काळाचा लोकमानसावर वेगळाच परिणाम जाणवतो. पितृपक्ष हा वाईट आहे . याकाळात शुभ घटना , नवी खरेदी, महत्त्वाची बोलणी करणे टाळाले जाते. मनात या काळा विषयी भिती बाळगली जाते. बाजारपेठामधली उलाढालही या काळात कमी झाल्याचे दिसते. महालयातील काळाचे अकारण भय बाळगले जाते. तसे पाहता महालयास भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून प्रारंभ होत असला तरी समाप्ती रवि तुळ राशीतून वृश्चिकेत गेल्यावर होते. यावर्षी १३ सप्टेंबर २०११ ला महालय सुरु होऊन महालय समाप्ती २७ सप्टेंबर २०११ ला आहे.
आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी आणि मुख्यतः आपले कर्तव्य समजून जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध.
आयुः प्रजां धनं विद्यां स्वर्गं मोक्षं सुखानि च।
प्रयच्छन्ति तथा राज्यं पितरः श्राद्धतर्पिताः॥ ( ब्रह्मपुराण )
श्रद्धेने श्राद्ध केल्यामुळे पितर तृप्त होतात श्राद्धकर्त्यास पुत्र, धन, विद्या, आयु, लौकिक सुख, मोक्ष तसेच स्वर्ग प्राप्त करता. आपल्या घराण्याची संमृद्ध विचार परंपरा अक्षय स्वरुपात आपल्या पर्यंत आणण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्याच्या तृप्ती साठी करायचे कर्म अत्यंत पवित्र असेच म्हणावे लागेल. किंबहूना ते मानवाचे प्रधान कर्तव्य आहे. आपल्या भाग्यवर्धनासाठी व्यवहारातील नातेसंबंध जोपासताना भेटवस्तुंची आदानप्रदान करतो, तसेच आपल्या मृतव्यक्ती विषयी आदरभाव श्राद्धकर्मातून व्यक्त केला जातो. आपल्या परिस्थितीनुसार सपिंडश्राद्ध, ब्रह्मार्पण, हस्तश्राद्ध, आमश्राद्ध व हिरण्यश्राद्ध करण्याची मुभा आहे. आपली पितरांविषयीची प्रेम, आपलेपण व्यक्त करण्यास साधना आवश्यक्यता आहे असे खचितच नाही.
न मे अस्ति वित्तं न धनं न चान्यत् श्राद्ध्योपयोगी स्वपितृन् नतोçस्मि ।
तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैते भुजौ कृतौ वर्त्मनि मारुतस्य॥
माझ्याजवळ धन नाही, श्राद्धास उपयुक्त वस्तु नाहीत , पण मी मनोभावे आपल्य पितरांना नमस्कार करीत आहे. माझ्या या भक्तीने माझे सर्व पितर तृप्त होवोत. यासाठी मी वा याच्या दिशेनेदोन्ही हात वर केले आहेत. असे म्हणून आपली असमर्थता व्यक्त केली तरी पितरांची कृपा होते. आपणही सर्वशक्तीनीशी पितरांची कर्तव्यभावनेने सेवा करा.
आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी आणि मुख्यतः आपले कर्तव्य समजून जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध.
आयुः प्रजां धनं विद्यां स्वर्गं मोक्षं सुखानि च।
प्रयच्छन्ति तथा राज्यं पितरः श्राद्धतर्पिताः॥ ( ब्रह्मपुराण )
श्रद्धेने श्राद्ध केल्यामुळे पितर तृप्त होतात श्राद्धकर्त्यास पुत्र, धन, विद्या, आयु, लौकिक सुख, मोक्ष तसेच स्वर्ग प्राप्त करता. आपल्या घराण्याची संमृद्ध विचार परंपरा अक्षय स्वरुपात आपल्या पर्यंत आणण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्याच्या तृप्ती साठी करायचे कर्म अत्यंत पवित्र असेच म्हणावे लागेल. किंबहूना ते मानवाचे प्रधान कर्तव्य आहे. आपल्या भाग्यवर्धनासाठी व्यवहारातील नातेसंबंध जोपासताना भेटवस्तुंची आदानप्रदान करतो, तसेच आपल्या मृतव्यक्ती विषयी आदरभाव श्राद्धकर्मातून व्यक्त केला जातो. आपल्या परिस्थितीनुसार सपिंडश्राद्ध, ब्रह्मार्पण, हस्तश्राद्ध, आमश्राद्ध व हिरण्यश्राद्ध करण्याची मुभा आहे. आपली पितरांविषयीची प्रेम, आपलेपण व्यक्त करण्यास साधना आवश्यक्यता आहे असे खचितच नाही.
न मे अस्ति वित्तं न धनं न चान्यत् श्राद्ध्योपयोगी स्वपितृन् नतोçस्मि ।
तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैते भुजौ कृतौ वर्त्मनि मारुतस्य॥
माझ्याजवळ धन नाही, श्राद्धास उपयुक्त वस्तु नाहीत , पण मी मनोभावे आपल्य पितरांना नमस्कार करीत आहे. माझ्या या भक्तीने माझे सर्व पितर तृप्त होवोत. यासाठी मी वा याच्या दिशेनेदोन्ही हात वर केले आहेत. असे म्हणून आपली असमर्थता व्यक्त केली तरी पितरांची कृपा होते. आपणही सर्वशक्तीनीशी पितरांची कर्तव्यभावनेने सेवा करा.
Subscribe to Posts [Atom]
Post a Comment