Sunday, March 13, 2011

 

विजयी व्हा !

प्रत्येक माणसाची आपले जीवन सुखमय, आनंदाने बहरलेले असावे अशी अपेक्षा असते आणि त्या दृष्टीने यथाशक्ती प्रत्येकाचे प्रयत्नही सुरु असतात. माणसाच्या सुखी जीवनास दुखाःच्या खाईत लोटणारी जी प्रधान कारणे आहेत, त्यात कोर्टकेस व आजारपण यांचा फार वरचा क्रमांक आहे. कोर्टकेसचा मने रक्तबंबाळ करणारा काटेरी विळखा संपूर्ण कुटुंबाच्या हलाखीस, अधोगतीस कारणीभूत ठरतो याचा ह्रदयद्रावक अनुभव कोणास येऊ नये यासाठी काय करावे हा प्रश्न सहजपणे मनात डोकावतो. सावध तो समाधानी। या सुत्रानुसार आपल्या संरक्षणाची व्यवस्था करणे हे प्रत्येकाचे प्रधान कर्तव्य आहे. कारण कलिप्रभावाने विश्वासघात करणारे बलवान झालेले दिसतात. प्रामाणिक प्रयत्न, सत्याचा मार्ग व मोहाचा त्याग करुन जीवन कंठणारे देखील कोर्टकेसमुळे भयावह मनस्ताप भोगताना दिसतात. कायद्याची पायमल्ली करणारे निरंकुश झाल्याने न्यायहक्काची मागणी हाच गुन्हा ठरत आहे असे चित्र आहे. यावर रामबाण उपाय काय याचा विचार करता कोर्टकेस ही दोन गटातील कायद्याच्या मर्यादेतील युद्धजन्य स्थितीच म्हणावी लागेल. शत्रुपक्ष पराभूत होण्यासाठी स्वतःचे मनःसामर्थ्य अतुलनिय असणे अत्यावश्यक आहे. जर केस करणारी व्यक्ती घरातील नसेल व शत्रुपक्ष अतिप्रबळ असेल तर त्यासाठी आपण रामचरित मानस मधील पुढील मंत्र म्हणणे समस्यानिवारक ठरते असा अनुभव आहे.
सुनहु पवनसुत रहनि हमारी । जिमि दसनन्हि महु जीभ बिचारी॥
यामुळे शत्रु भयभीत होतो, प्रसंगी माघार घेतो, किंवा सामंजस्याने तोडगा काढण्यास तयार होतो. आपली सत्याची बाजू असेल तर हा उपाय निश्चितच लाभप्रद सिद्ध होईल.
पण जर कुटुंबातील व्यक्तीनेच काही कारणास्तव कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडले असेल, तर आपण पुढील मंत्र म्हणावा.
गरल सुधा रिपु करहिं मिताई। गोपद सिन्धु अनल सितलाई॥
या मुळे गैरसमजाचे समस्याप्रद ढग दूर होतात व नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा विचार मनात रुजण्यास प्रारंभ होतो. ज्यांना कोर्टकेसच्या चक्रातून आपली सुटका करायची असेल त्यांनी या अनुभव सिद्ध मंत्रांचा जरुर अनुभव घ्यावा.

विक्रमादित्य पणशीकर
पेडणे गोवा
९०४९६००६२२
skype id - vikram.panshikar

Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]





<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica