Sunday, March 13, 2011
गुरुकृपा
आपल्या पैकी अनेकांची जन्मानंतर जन्मपत्रिका केली जाते. जन्मनक्षत्राच्या चरणाक्षरानुसार नाव ठेवण्याची पद्धत आहे.जन्मराशीनुसार आपल्या भविष्याचा विचार केला जातो. साधारणपणे प्रत्येक जण पेपर बहितल्यानंतर प्रथम आपले आजचे भविष्य काय आहे हे उत्सुकतेने पहातो हे अनेक जण मान्य करतात.आपल्या पत्रिकेतील नवग्रहापैकी गुरुमहाराज हे भाग्यवर्धन करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. गुरुच्या कृपेने आपल्या पुर्वजन्मातील पुण्यफळास येते असा अनुभव आहे. नाडी ग्रंथात अगस्तीऋषी, भृगुऋषी, देवकेरल चंद्रकलानाडी या विश्वप्रसिद्ध ग्रंथात गुरुग्रहाचा विचार करुन विविध ज्योतिष सुत्रांचा आधार घेऊन जातकाचे भविष्य वर्तवले आहे.
आपल्या आयुष्यातील सर्वाधिक शुभ घटनेचा मुलाधार गुरुग्रह असतो असा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे गुरुचे गोचरी भ्रमण आपणास केव्हा अनुकूल होईल याची प्रत्येक जण वाट पहात असतो. शुभ गोचरभ्रमणात प्रगतीस संधी, मंगलकार्ये , विद्याध्ययन, कार्यसाधक भेटीगाठी, व्यावसायिक स्थिरता या प्रकारच्या घटना घडतात. मुख्यता आयुष्यावर शुभ व स्मरणीय परिणाम करण्यात गुरुचा पुढाकार असतो. गुरुग्रह आपल्या पत्रिकेत अष्टकवर्गपद्धतीनुसार जेव्हा सर्वात जास्त शुभबिंदुयुक्त राशीतुन भ्रमण करतो. तेव्हा लक्षणीय घटना घडतात असा अनुभव आहे. आपल्या पत्रिकेवरुन याचा शोध घेणे शक्य होते. आपल्या जन्मपत्रिकेत गुरु ज्याराशीत आहे त्या राशीत अत्यल्प शुभ बिंदु असतील तर भाग्यवर्धक हे गुण वैशिष्ट असणारा गुरु समस्याप्रद ठरतो. यासाठी गुरुकृपेसाठी काही सोपी उपासना करणे गरजेचे आहे. १) दर गुरुवारी हर्बरा डाळ गाईस खाण्यास देणे. २) रोज दत्तबाबनी हे श्रीरंगावधुत महाराजांनी रचलेले स्तोत्र वाचावे. (आपणास हवे असेल तर याची mp3 फाईल मोफत पाठवली जाईल) ३)नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र रोज म्हणावा.(आपणास हवे असेल तर याची mp3 फाईल मोफत पाठवली जाईल) ४) माम् पाहि भगवन् दत्त। या मंत्रांचा रोज १००० वेळा जप केल्यास अनाकलनीय लाभ होतो असा अनुभव आहे. आपणासही आयुष्यास मंगलमय, आनंददायक, सर्वथा अभेद्य असे गुरुकृपेचे कवच प्राप्त करायचे असेल, तर केवळ श्रद्धेची गरज असणारे वरील सोपे उपाय करण्याचा सौभाग्यजनक निर्णय घ्या.
विक्रमादित्य दाजी पणशीकर.
पेडणे गोवा -
९०४९६००६२२
vnp999@gmail.com
आपल्या आयुष्यातील सर्वाधिक शुभ घटनेचा मुलाधार गुरुग्रह असतो असा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे गुरुचे गोचरी भ्रमण आपणास केव्हा अनुकूल होईल याची प्रत्येक जण वाट पहात असतो. शुभ गोचरभ्रमणात प्रगतीस संधी, मंगलकार्ये , विद्याध्ययन, कार्यसाधक भेटीगाठी, व्यावसायिक स्थिरता या प्रकारच्या घटना घडतात. मुख्यता आयुष्यावर शुभ व स्मरणीय परिणाम करण्यात गुरुचा पुढाकार असतो. गुरुग्रह आपल्या पत्रिकेत अष्टकवर्गपद्धतीनुसार जेव्हा सर्वात जास्त शुभबिंदुयुक्त राशीतुन भ्रमण करतो. तेव्हा लक्षणीय घटना घडतात असा अनुभव आहे. आपल्या पत्रिकेवरुन याचा शोध घेणे शक्य होते. आपल्या जन्मपत्रिकेत गुरु ज्याराशीत आहे त्या राशीत अत्यल्प शुभ बिंदु असतील तर भाग्यवर्धक हे गुण वैशिष्ट असणारा गुरु समस्याप्रद ठरतो. यासाठी गुरुकृपेसाठी काही सोपी उपासना करणे गरजेचे आहे. १) दर गुरुवारी हर्बरा डाळ गाईस खाण्यास देणे. २) रोज दत्तबाबनी हे श्रीरंगावधुत महाराजांनी रचलेले स्तोत्र वाचावे. (आपणास हवे असेल तर याची mp3 फाईल मोफत पाठवली जाईल) ३)नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र रोज म्हणावा.(आपणास हवे असेल तर याची mp3 फाईल मोफत पाठवली जाईल) ४) माम् पाहि भगवन् दत्त। या मंत्रांचा रोज १००० वेळा जप केल्यास अनाकलनीय लाभ होतो असा अनुभव आहे. आपणासही आयुष्यास मंगलमय, आनंददायक, सर्वथा अभेद्य असे गुरुकृपेचे कवच प्राप्त करायचे असेल, तर केवळ श्रद्धेची गरज असणारे वरील सोपे उपाय करण्याचा सौभाग्यजनक निर्णय घ्या.
विक्रमादित्य दाजी पणशीकर.
पेडणे गोवा -
९०४९६००६२२
vnp999@gmail.com
Subscribe to Posts [Atom]
Post a Comment