Sunday, March 13, 2011
ईश सेवा
आपल्या जीवनात सदाचरण व सात्विकता हे दैवीगुण प्रयत्नपूर्वक जोपासले जावेत असे मार्गदर्शन संतामहात्मे करत असतात. आपण जे अर्थार्जन करतो ते नेहमी सन्मार्गाने असावे असा संतांचा आग्रह असतो.
कलियुगाच्या प्रभावाने आपल्या सुखासमाधानाच्या अपेक्षा झपाट्याने बदलत गेल्या, अपेक्षांची पूर्ती करताना योग्यायोग्यतेचे भानही हरपले. "सहज मिला सो दुध बराबर , मांग मिला सो पानी । खींच लिया सो खुन बराबर, कहे कबीर की बानी॥" हे कबीरवचन आपणास सावधानतेचा इशार देत आहे. आपण अर्थाजन कसे करतो, त्याचा विनियोग कोणत्या कामासाठी करतो हे फार महत्त्वाचे आहे. श्रीमद्भागवतात प्रातःस्मरणीय श्रीशुकाचार्य सांगतात --
धर्माय यशसेऽर्थाय कामाय स्वजनाय च ।
पञ्चधा विभजन वित्तमिहामुत्र च मोदते॥ ८/१९/३२
अर्थ - जो मनुष्य आपले धनाचे पाच भाग करतो -धर्मासाठी,यशवृद्धीसाठी धनवृद्धीसाठी,उपभोगासाठी आणि स्वजनांसाठी ,तो इहलोकात व परलोकात सुखी होतो.
आपल्या पैशाचा उपभोग घेताना तो कसा घ्यावा हे या श्लोकात सांगितले आहे. धर्माय म्हणजे धर्मकार्यासाठी पैशाचा वापर करावा. आता धर्मकार्य म्हणजे केवळ पूजापाठ असा अर्थ नव्हे तर ज्या ईश्वराच्या शुभाशीर्वादासाठी सगळा खटाटोप त्याला काय प्रिय आहे याचा विचार महत्त्वाचा आहे. देव हा भक्तवत्सल आहे, हे आपण जाणतोच. मग आपल्या स्वकष्टार्जित धनाचा वापर भगवंताच्या दैवीगुणांची उपासना करण्यासाठी करणे योग्य आहे.
रामरक्षेत रामरायाचे गुणवर्णन विद्यानिधी असे केले आहे. आपण केवळ रामरक्षा म्हणून रामसेवेतही स्वरक्षणाचे हित पाहत असतो, आपण जर विद्यानिधी रामाच्या गुणांचा अंगिकार करणा या विद्यार्थांना सहकार्याचा हात पुढे केला त्यांना आवश्यक असणा या सुविधा देण्यात उत्साह दाखवला. तर रामरायाची अमोघ कृपा आपण सहजतेने प्राप्त करु शकतो, आणि आजच्या काळाची ही अत्यावश्यक गरजही आहे. या कार्याने आपल्या धनाचा वापर ईश्वरसेवेसाठी होतोच , पण परोपकाराची सहजप्रेरणा कुलसंवर्धक ठरते. " परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम । हा संदेश आपल्या संस्कृतीने जगास दिला तो आपल्या आचरणातून दिसणे अत्यावश्यक नव्हे का ?
कलियुगाच्या प्रभावाने आपल्या सुखासमाधानाच्या अपेक्षा झपाट्याने बदलत गेल्या, अपेक्षांची पूर्ती करताना योग्यायोग्यतेचे भानही हरपले. "सहज मिला सो दुध बराबर , मांग मिला सो पानी । खींच लिया सो खुन बराबर, कहे कबीर की बानी॥" हे कबीरवचन आपणास सावधानतेचा इशार देत आहे. आपण अर्थाजन कसे करतो, त्याचा विनियोग कोणत्या कामासाठी करतो हे फार महत्त्वाचे आहे. श्रीमद्भागवतात प्रातःस्मरणीय श्रीशुकाचार्य सांगतात --
धर्माय यशसेऽर्थाय कामाय स्वजनाय च ।
पञ्चधा विभजन वित्तमिहामुत्र च मोदते॥ ८/१९/३२
अर्थ - जो मनुष्य आपले धनाचे पाच भाग करतो -धर्मासाठी,यशवृद्धीसाठी धनवृद्धीसाठी,उपभोगासाठी आणि स्वजनांसाठी ,तो इहलोकात व परलोकात सुखी होतो.
आपल्या पैशाचा उपभोग घेताना तो कसा घ्यावा हे या श्लोकात सांगितले आहे. धर्माय म्हणजे धर्मकार्यासाठी पैशाचा वापर करावा. आता धर्मकार्य म्हणजे केवळ पूजापाठ असा अर्थ नव्हे तर ज्या ईश्वराच्या शुभाशीर्वादासाठी सगळा खटाटोप त्याला काय प्रिय आहे याचा विचार महत्त्वाचा आहे. देव हा भक्तवत्सल आहे, हे आपण जाणतोच. मग आपल्या स्वकष्टार्जित धनाचा वापर भगवंताच्या दैवीगुणांची उपासना करण्यासाठी करणे योग्य आहे.
रामरक्षेत रामरायाचे गुणवर्णन विद्यानिधी असे केले आहे. आपण केवळ रामरक्षा म्हणून रामसेवेतही स्वरक्षणाचे हित पाहत असतो, आपण जर विद्यानिधी रामाच्या गुणांचा अंगिकार करणा या विद्यार्थांना सहकार्याचा हात पुढे केला त्यांना आवश्यक असणा या सुविधा देण्यात उत्साह दाखवला. तर रामरायाची अमोघ कृपा आपण सहजतेने प्राप्त करु शकतो, आणि आजच्या काळाची ही अत्यावश्यक गरजही आहे. या कार्याने आपल्या धनाचा वापर ईश्वरसेवेसाठी होतोच , पण परोपकाराची सहजप्रेरणा कुलसंवर्धक ठरते. " परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम । हा संदेश आपल्या संस्कृतीने जगास दिला तो आपल्या आचरणातून दिसणे अत्यावश्यक नव्हे का ?
Subscribe to Posts [Atom]
Post a Comment